मराठी चित्रपटसृष्टीतल्या काही अशा नायकांची नावं घ्या जे त्यांच्या साधेपणा,
नम्रता आणि वचनबद्धतेसाठी प्रसिद्ध आहेत. तुषार दळवी हे सुद्धा नाव अशा
नावांपैकी एक आहे. मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात लहानाचं मोठं
झाल्यनंतर मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम (पोस्ट ग्रॅज्युएशन)
पूर्ण केल्यानंतर कोणीही माणूस बड्या पगाराची नोकरी बघून मुंबईत
इतरांप्रमाणे स्थिरावण्याचं ठरवेल पण स्व आत्मविश्वासाने काहीसा धोका
पत्करत तुषार दळवीने हे सर्व सामान्य जीवन सोडून अभिनयालाच पूर्ण वेळ देऊन
त्यातच आपलं भवितव्य घडवायचं असा निर्णय घेतला.
या क्षेत्रात साधारणतः १० वर्षे काम केल्यानंतर त्याने रंगमंच, मालिका आणि
चित्रपट या क्षेत्रात वेगवेगळ्या भूमिका स्विकारुन त्यांना न्याय देऊन
स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. एवढच नाही तर त्याने मराठी आणि हिंदी
दोन्ही कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जवाबदारीसुद्धा अगदी व्यव्स्थित पार
पाडली आहे. सध्या एक अभिनेता म्हणून त्याला मागणी आहे मग ते मालिका असो
किंवा चित्रपट. काही भूमिका हया त्याच्या व्यक्तिमत्त्वातूनच खुलतात.
उदाहरण म्हणून सांगते. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अनोळखी हे घर
माझे' या चित्रपटातली त्याची थोडी नकारात्मक छटा असलेली आणि वडिलांच्या
विरोधात जाणारा मोठा मुलगा, तसेच 'रिटा' चित्रपटातील सरस्वती(रेणुका शहाणे)
चा परंपरांना महत्त्व देणारा नवरा. आणि आता तो साकारत आहे भार्गवी चिरमुले
हिचा खूप काळजी घेणारा, प्रेमळ नवरा 'अनुबंध' या मालिकेत. त्याच्या
भूमिकांच्या या वेगळेपणाने तो कायमच प्रेक्षकांच्या दृष्टीक्षेपात राहिला
आहे. म्हणूनच तुषारबद्दल अजून जाणून घेण्यासाठी मुंबईत 'अनुबंध' च्या सेट
वर गाठलं.
 |
या क्षेत्राची निवड- कारण आवड/ महत्त्वकांक्षा?
- माझ्या महाविद्यालयीन जीवनात मी आंतर महाविद्यालयीन नाट्य
स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये भाग
घ्यायचो आणि काही राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुद्धा माझा सहभाग
घेतला होता. त्या दिवसांमध्ये मी माझ्या अभ्यासाव्यतिरीक्त माझा
छंद जोपासण्यासाठी रंगमंचावर काम करत होतो तेव्हा मी प्रायोगिक
नाटक जास्त केली होती. पण जेव्हा मी मॅनेजमेंटच्या पोस्ट
ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा मी एका विदेशी
बॅकेबरोबर प्रोजेक्ट करत होतो, आणि तेव्हाच मी ठरवलं की
अभिनयातच करीअर करायचं. |
|