मराठी रंगभूमीच्या इतिहासातल्या बालगंधर्व सुवर्णयुगापासून आजच्या काळातल्या संगीत
मराठी रंगभूमीचा प्रवास आणि त्यातली स्थित्यंतरे यांचा आलेख आखत दुसरीकडे आजवर
अज्ञात असलेला अनेक प्रकारचा तपशीलही उलगडणारा "रंगयात्रा" हा रंगीत - संगीत
कार्यक्रम ०६ फेब्रुवारी रोजी मुंबईत होत आहे.
'कलांगणच्या जल्लोष २०१२' अंतर्गत होत असलेल्या 'रंगयात्रा' या कार्यक्रमाची
संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन मराठी संगीत रंगभूमीचे अभ्यासक वर्षा भावे यांचे आहे.
चार ते पंचवीस वयोगटातले बाल आणि तरुण कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
वर्षा भावे, चैतन्य कुलकर्णी, केतकी भावे, अवंती पटेल, आदिती आमोणकर, सोमेश
नार्वेकर, सायली महाडिक, गायत्री फुणगुसकर, ईशा लिमये, नंदिनी आमोणकर, अपूर्वा
क्षीरसागर, कुहू दातार, नेहा कुलकर्णी, कलिका नाईक, तन्वीर मुणगेकर, राशी हरमळकर,
निवेदक पूर्वी भावे व आदित्य सुरते कलावंतांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम ६
फेब्रुवारी रोजी ६:४५ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे हा
कार्यक्रम सादर केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९५९४९६२५८७/९३ येथे संपर्क साधा