सध्या आपल्या देशापुढील मोठी समस्या अशी आहे की वाढत्या गुन्हेगारीला आळा
कसा घालायचा. मद्यधुंद अवस्थेत कुणाचाही खुन करुन सहिसलामत सुटणारी 'बडे
बापकी औलाद' आपण पाहतो. आज हे सर्व पहायचे, वाचायचे आणि उद्या सर्व विसरुन
जायचे या खेरीज आपण काहीच करत नाही. परंतु ज्यांना हे प्रत्यक्ष सहन
करण्याची पाळी येते, त्यांना व त्यांच्या निकटवर्तियांनाच माहित असावे
गुन्हेगारांना योग्य शासन न मिळण्याचे दु:ख!
रमेश देव फिल्म्स व लोकमत एन्टरटेन्मेंट प्रा. लि. यांनी सादर केलेला नवा
चित्रपट 'जेता' अशाच एका हताश झालेल्या आई- वडिलांची कथा घेऊन आलेला आहे.
प्रो. यशवंत राजाध्यक्ष व सौ. राजाध्यक्ष ( रमेश देव आणि सीमा देव) यांची
कन्या श्वेता (मनवा नाईक) हिचा खून तिच्या वडिलांदेखत तीन तरुण करतात आणि
कोर्टात त्यांची निर्दोश मुक्तता होते.
पुढे सुप्रिम कोर्टात अपिल करण्याऐवजी ते एक वेगळा मार्ग अवलंबीतात केवळ
बदला घेण ही एकच इच्छा त्यांच्यापुढे असते. त्यानुसार योग्य योजना आखून ते
तीनपैकी दोघांचा खून करण्यात यशस्वी होतात. पुराव्याअभावी पोलिसांनाही
कोणाला अटक करता येत नाही. संशयाची सुई मात्र कळंबी गावातील समाजसेवक-
प्रभाकर (शरद पोंक्षे) वर जाते. कारण प्रभाकरचा
HTML clipboard
SRZ ला विरोध असतो श्वेताला याच गावामध्ये डॉक्युमेंटरी फिल्म बनविण्यासाठी त्याने मदत केलेली असते.
झालेल्या दोन खुनांचा तपास करण्यासाठी ए सी पी विक्रांत मराठे (अजिंक्य देव)
केस हाती घेतो आणि त्याबरोबरच श्वेताची केसही पुन्हा ओपन करतो. प्रभाकरला
संशयित म्हणून अटक करुन मग तो राहिलेल्या तिसर्या तरुणाचे (प्रसाद ओक)
पोलिस प्रोटेक्शन काढून घेतो. नेमकी हीच वेळ साधून प्रो. राजाध्यक्ष आपला
डाव साधण्यास बाहेर पडतात. पण नेमके आयत्यावेळी अडचणीत येतात. त्यांच्या
मदतीला तिसरी व्यक्ती येते.
|
 |
आपले मिशन पूर्ण केल्यावर प्रो. राजाध्यक्ष
आणि सौ. राजाध्यक्ष मनमोकळेपणाने समुद्रकिनारी फिरतात. याचवेळी ते
प्रेक्षकांशी संवाद साधतात. 'जर न्यायव्यवस्था भक्कम असेल तर गुन्हे घडतीलच
कशाला?" शेवटी ते सर्वांना सांगून टाकतात "अन्यायाला पुढे येऊन विरोध करा.
तुमची लढाई निर्भयपणे लढा आणि जेता' म्हणवून घ्या."
सध्याच्या स्थितीत जेव्हा आपण अट्टल गुन्हेगारांना शिक्षेला हुलकावण्या
देतांना पाहतो तेव्हा खरोखरच विचार पडतो, यांना जागीच गोळ्या का मारत नाहीत.
अतिरेक्यांना फेक एनकाऊंटरमध्ये मारणेच योग्य आहे का, या प्रश्नाचे उत्तर
हा चित्रपट पाहिल्यावर मिळते. |
सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय. अजिंक्य देव- अमोल शेटगे यांचे चांगले
दिग्दर्शन, योग्य रितीने साकार केलेली पटकथा व त्याला साजेसे संवाद हेच 'जेता'
या चित्रपटाचे वैशिष्ट्य. एकूण काय तर बर्याच दिवसांनी एक सनसनाटी
विषयावरील 'ऍक्शन' चित्रपट पाहण्याची संधी मराठी चित्रपटरसिकांना 'जेता'द्वारे
मिळाली
|